अकोल्यात खून ! प्रा.रणजीत इंगळे यांची हत्या : ६ दिवसात दुसरी घटना.....

अकोल्यात खून ! प्रा.रणजीत इंगळे यांची हत्या : ६ दिवसात दुसरी घटना.....
अकोला : राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या अकोला शहरात काल शनिवारी रात्रीला सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याने अकोला हादरले आहे. मृतक इंगळे हे दिव्यांग असून त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्य केले आहे.त्यांच्या हत्येच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, राज्याचे गृहमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांचे आज रविवार १८ जून रोजी अकोला शहरात आगमन होत आहे.

जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव रोड वरील गंगानगर परिसरात राहणारे प्रा.रणजीत इंगळे रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे जात असताना, मोबाईलवर कॉल आला. तेव्हा मोटारसायकल उभी करून, मोबाईलवर बोलत असताना, अज्ञात व्यक्तीने मागून येवून इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार घातला. जोरदार वार घातल्याने डोक्यातून रक्तस्राव होवून इंगळे रस्त्यावर कोसळले.



मारेक-याने जखमी इंगळेला ओढून उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागे नेऊन टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळाने ही घटना घडकीस आली. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून रात्रीला मृतदेह पोस्टमार्टमसाठी सर्वोपचार मध्ये पाठवला. या घटनेमुळे गीता नगर, गंगा नगर परिसरात दहशत निर्माण झाली असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एका कॅमे-यात ही घटना रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी या कॅमेरातील फुटेज ताब्यात घेतले असून, मारेकरी एकटा असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे केवळ डोक्यावरचं मोठा घाव असून, लूटण्याच्या उद्देशाने ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट होते. कारण त्यांच्या जवळील पैसे व वस्तू तशाच आहेत. अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रणजीत इंगळे कार्यरत होते.यासोबतच काही काळ अकोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ही पदाधिकारी म्हणून त्यांनी सक्रिय कार्य केले आहे. दिव्यांग प्रा. इंगळे हे महाविद्यालयात किंवा राजकारणात कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून दूरचं होते. अजातशत्रू म्हणून सर्वत्र परिचित इंगळे यांची आजवर कोणाही सोबत शाब्दिक बाचाबाची देखील झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान त्यांनी सेवानिवृत्त घेऊन,जुने बस स्थानक परिसरात सेतू केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी देखील कुणासोबत कधीही वाद झाला नसल्याचे परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची हत्या होण्यामागे नेमके कारण काय ? हे आता पोलीस शोधत आहेत त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे