Posts

पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ !ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार...

Image
पत्रकार चौथा आधारस्तंभच नव्हे, समाजाचा दीपस्तंभ ! ग्रामीण पत्रकारिता लोकशाहीचा कणा बातमीच्या वेगापेक्षा सत्यता व विश्वसनीयता महत्त्वाची सुधीर मुनगंटीवार बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी ठेवण्यात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकार हा केवळ लोकशाहीचा बौथा आधारस्तंभनसूर, समाजाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ आहे. सत्ताधारी असो वा प्रशासन, त्यांच्या कामकाजावर लोकशाहीच्या चौकटीत विभर्भीडपणे प्रश्न उपस्थित करून सामान्ना जनतेचा आवाज शासनदरबारी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकात करीत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदत सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संधाच्या वतीने आयोजित बंद्रपूर किल्लास्तरीय पत्रकार मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संपाचे राज्याध्यक्ष गजानन बाधबारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. यावेळी राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प...

बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीचीव कावड मंडळांची बैठक...

Image
बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीचीव कावड मंडळांची बैठक... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शांतता समितीची कावड मंडळांची संयुक्त बैठक घेण्यात आली. येणाऱ्या श्रावण मासात अधिक जास्त धार्मिक उत्सव असून, यामध्ये कावड यात्रा व ईद मिलाद येत्या आठवडयात आहेत हे सण, उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी मुर्तिजापूर /बार्शिटाकळी च्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे मॅडम व परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकारी धनराज देवर्जनकर, गावातील शांतता समितीचे सदस्य, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार व शहरातील तसेच ग्रामीण भागातील पालखी मंडळांनी उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवला तर विविध सामाजिक बांधिलकी जोपासण्या बाबत लोकप्रतिनिधी यांनी समूहिक विषय मांडले पोलिस स्टेशनला प्रथमच नव्याने रुजू झालेले परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे मॅडम यांनी यावेळी कायदा व सु...

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू.....

Image
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी: बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला परीक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे रुजू झाले आहेत. बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला काही दिवसापासून पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे कार्यरत होते. 11 ऑगस्टला परिविक्षाधिन पोलीस अधिकारी आनंद कांदे हे रुजू झाले आहेत. तर बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना जिल्हा कार्यालयामध्ये प्रभार देण्यात आल्याचे समजते. पोलीस अधिकारी आनंद कांदे यांना पोलीस सेवेमध्ये कार्य करण्यासाठी प्रथमच बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा कारभार दिला आहे. कायदा सुव्यवस्था व शांतता निर्माण करत गुन्हेगारीला प्रतिबंध करत पोलीस सेवेचे कार्य करत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

बार्शिटाकळी पोलिसांनी दिले चार गोवंशाना जिवदान "परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे'' यांची कारवाई....

Image
बार्शिटाकळी पोलिसांनी दिले चार गोवंशाना जिवदान  "परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे'' यांची कारवाई.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बार्शिटाकळी पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या ४ गायींची सुटका केली. ११ ऑगस्ट रोजी रात्री खोलेश्वर मंदिर ते हालोपूरा रस्त्यावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे ८७ हजार रुपये किमतीच्या १ गाय ३ गोरे जप्त केल्या. पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती मिळताच आरोपी गुरे मागे सोडून पळून गेले. चारही गोवंशाना म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा संस्थेत संवर्धनासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नव्याने रुजू झालेले परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांचे मार्गदर्शनात,एएसआय फराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक अनिल येनेवार, हेडकॉन्स्टेबल ईश्वर पातोंड, अमोल हाके यांनी कारवाई केली. 

अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची बैठक संपन्न.....

Image
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणीची बैठक संपन्न..... प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला :- अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज अध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला संपूर्ण नवीन कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष महासचिव सचिव कोषाध्यक्ष उपस्थित होते. महेश गणगणे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.झीशान हुसेन उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशांत पाचडे ,सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अक्षय राऊत सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सह माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे व ज्येष्ठ नेते डॉ.अशोक बिहाडे हे या ठिकाणी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटीचे विजय देशमुख महासचिव यांनी प्रास्ताविक केले व पक्षात प्रोटोकॉल आणि स्वयंशिस्त यावी यासाठी काही अत्यावश्यक सूचना केल्याया त्यानंतर सर्वांना नियुक्तीपत्र व मीटिंग चे मिनिट्स विषय पत्रिका घेऊन तिरंग्यात पंजाच्या दुपट्ट्याने स्वागत करण्यात आला प्रदेश पदाधिकारी व माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे यांच्या हस्ते सगळ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले तर नंतर वि...

महात्मा फुले नगर मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन....

Image
महात्मा फुले नगर मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- महात्मा फुले नगर मधील बौद्ध विहार मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन चालू केले असुन सदर ग्रंथाचे वाचन हे बोधाचार्य कैलासजी मोहोड हे करीत आहेत, महात्मा फुले नगर मधील बौद्ध उपासक व उपासिका याचा लाभ घेत आहेत सदर ग्रंथ वाचन वेळी फुले नगर मधील रमाई महिला संघाचे रमाबाई जामणीक, मंदाताई वानखडे, अनिता सुनिल शिरसाठ, नंदाबाई भिमराव खडे, जोसनाताई वानखडे, सुजाता धाराजी ठोले, राजकन्या मोहोड, अनिता दादाराव जामनिक, सुनंदाताई बनसोडे, सिताबाई बाबाराव अरखराव, नर्मदाबाई शिरसाट, वंदना जामणीक, तसेच महात्मा फुले नगर मधील महिला आणी पुरुष मोठ्या संख्येने हजर राहत आहेत, अशी माहिती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांनी दिली आहे.

गुरुवर्य केवळ भारती महाराजांचे निधन.....उद्या मांगुळ येथे अंत्यसंस्कार......

Image
गुरुवर्य केवळ भारती महाराजांचे निधन..... उद्या मांगुळ येथे अंत्यसंस्कार...... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  राज्यातील विविध भक्तांचे श्रद्धास्थान प.पु. गुरुवर्य केवळ भारतीजी महाराज गुरु चंचल भारती जी महाराज वय 101 वर्ष यांचे शनिवार दिनांक १ ऑगस्टला निधन झाले आहे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट ला बार्शिटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील,दत्त मंदिर परिसरात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे.  बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी ते धाबा रोडवर मिर्जापुर फाट्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मांगुळ हे लहान गाव आहे. या गावात गेल्या अनेक वर्षापासून दत्त मंदिरामध्ये प.पू. गुरुवर्य वंदनीय केवळ भारतीजीगुरु चंचल भारतीजी महाराज वय 101 वर्ष हे वास्तव्यास होते. त्यांनी दत्त आनंदसांप्रदाय अंतर्गत राज्यातील विविध गावात दत्त मंदिराची निर्मिती करण्यात पुढाकार घेतला आहे. दत्त सांप्रदाय प्रमाणेच राज्यातील विविध सांप्रदायाचे अनेक साधुसंत व भक्तगण त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे सांप्रदायाची प्रगती करत अनेक भक्तांचे दुःखमय संसा...