पोळ्याला वाळलेल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन.....
पोळ्याला वाळलेल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुक्याला दुष्काळ घोषित करण्याकरिता, पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन पीक, वाजंत्री व, बैलासह' तहसील कार्यालयासमोर सरकार विरुद्ध निषेध आंदोलन केले. बार्शिटाकळी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठी शेतातील वाळलेले सोयाबीन पीक हातात धरून गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला पोळ्याच्या दिवशी बैलांना सोबत घेऊन सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी बार्शिटाकळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी महादेव गावंडे, वैभव गावंडे, विजय देशमुख, जनार्दन ठोकळ, रामेश्वर नानोटे, साहेबराव आंधळे, विनोद माळकर, अजय नानोटे, आनंद सुरडकर, सुधीर माळकर, रवींद्र खंडारे, गजानन गीते, गोपाल मानकर, सुभाष गावंडे, संतोष जाधव, विनायक पवार, सेवा पवार, किरण ठाकरे, सहदेव चव्हाण , रोहित पवार, संतोष, रोहनकार , महेंद्र इंगोले, प्रल्हाद माळकर गणेश ताठे, अशोक लोणाग्रे, रवी बिडवे, बाबाराव इंगोले, दादाराव जाधव, शिवप्रताप मेघाडे, विजय येलकर, निलेश जाधव, विनोद...