∆गोर बंजारा विमुक्त जाती (VJA)प्रवर्गातील आरक्षणातील खोटे (बोगस) राजपूत भामटांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी....... ∆गोर सेनेच्या वतीने म्हणून महाराष्ट्रत तीनशेच्यावर तालुक्यात दिले निवेदन........

∆गोर बंजारा विमुक्त जाती (VJA)प्रवर्गातील आरक्षणातील खोटे (बोगस) राजपूत भामटांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी....

∆गोर सेनेच्या वतीने म्हणून महाराष्ट्रत तीनशेच्यावर तालुक्यात दिले निवेदन.... 


बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
-महाराष्ट्रातील गोर बंजारा विमुक्त जाती (VJA) प्रवर्गातील आरक्षणात मूळ राजपूत भामटा सोडून इतर बिगर मागास समाजातील उदा. राजपूत,छप्परबंध, मीना, परदेशी जातीचे खोटे प्रमाणपत्र जोडून विमुक्त जाती (VJA) मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत आहे. त्यामुळे मूळ गोर बंजारा विमुत जाती (अ) यांच्यावर अन्याय होत आहे.आरक्षणातील ही घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी म्हणून महाराष्ट्रात जिल्हा, तालुक्यात 300 च्या वर तहसीलदार, जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना एकाच दिवशी दिले निवेदन विमुक्त जातीतील घुसखोरी थांबवली नाही तर गोर सेना आक्रमक भुमीका घेईल असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील गोर सैनिक यांनी केले आहे.
या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी दिनांक ११ मे २०२२ रोजी गोर सेनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे गोरसेनेच्या वतिने आंदोलन करण्यात आलेले होते. तसेच दिनांक २२ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी गोर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनही केलेले आहेत. 

मूळ विमुक्त जाती प्रवर्ग (अ) मध्ये मागील अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या जातीतील लोकांनी (उदा, राजपूत, छप्परबंद, परदेशी व मिना) मोठ्या प्रमाणात अवैध रित्या घुसखोरी कलेला असल्यामुळे मूळ विमुक्त जाती प्रवर्ग (अ) मधील लोकांवरती सातत्याने अन्याय होत असून शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरवर्षी साधारणतः नोकर भरतीमध्ये व एम. बी. बी. एस./ बी. ए. एम. एस. इंजिनिअरिंग सारख्या प्रवेश प्रक्रीमध्ये पाच हजाराहून अधिक विद्यार्थी व नोकरदारांवर अन्याय होत असताना दिसून येत आहे. विशेषतः राजपूत समाजातील लोकांनी वि.जे. (अ) प्रवर्गातील राजपूत भामटा जातीच्या नावाचा गैरफायदा घेऊन अवैधरीत्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली निदर्शनात आलेला आहे. या संदर्भात गोर सेनेकडून आंदोलन करूनही आज पावेतो कुठल्याच प्रकारचे शासनाकडून प्रतिबंध घालण्यात आलेले नाही. तसेच अलीकडील काही दिवसापासून शासकीय स्तरावर वि. जे. (अ) प्रवर्गात असलेल्या मूळ राजपूत
भामटा या जातीच्या नावामधून भामटा हा शब्द काढण्याच्या हालचाली मोठया प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे मूळ विमुक्त जाती (अ) या जातीचे आरक्षण पूर्णतः धोक्यात आलेले आहे त्यामुळे एकूणच विमुक्त जाती प्रवर्ग (अ) चे
आरक्षण सुद्धा धोक्यात आले आहे. करिता करिता गोर सेनेच्या वतीने उपरोक्त विषयाला अनुसरून खालील मागण्या करण्यात येत आहे.

१) बिगर मागास वर्गीय जातीच्या लोकांकडून (उदा. राजपूत, छप्परबंद, परदेशी व मिना) मूळ वि. जे. (अ) प्रवर्गात होत असलेली अवैध घुसखोरी कायमस्वरूपी रोखण्यात यावी.. २) अवैध रित्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. व त्यांची अवैध जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी. (३) जात पडताळणी समिती / जात वैधता पडताळणी समितीवर ज्या जिल्ह्यामध्ये गोर बंजारा समाज आहे त्या जिल्ह्यामध्ये गोर बंजारा समाजाचा एक जानकार प्रतिनिधी नेमण्यात यावे. व जिथे गोर बंजारा समाज व्याला नाही तेथे मूळ वि.जे. (अ) प्रवर्गातील कुठल्याही एका जानकार व्यक्तीला जात वैधता पडताळणी समितीवर प्रतिनिधी म्हणून नेमण्यात यावे. ४) १९३१ च्या जनगणने प्रमाणे व १९६१ च्या थाडे कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात वि. जे. (अ) प्रवर्गातील मूळ राजपूत भामटा वास्तव्याला होते त्या गावच्या नावाची जाती निहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी.

(५) राजपूत भामटा मधील भामटा हा शब्द वगळू नये.

मागील काही वर्षापासून वारंवार निवेदन, मोर्चा, उपोषण, रास्ता रोखो आंदोलन करून सुद्धा प्रशासनाने कोणतीही गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही. जर विमुक्त जाती (VJA) या प्रवर्गातील खोटे राजपूत भामटा यांची घुसखोरी रोखली नाही तर येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रमध्ये गोर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आंदोलनामुळे होणाऱ्या परिनामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असेही बार्शिटाकळी तालुक्यातील, गोर सिकवाडी तालुका संयोजक विलास जाधव, गोर सेना उपाध्यक्ष अतिश राठोड, शहर अध्यक्ष राहुल राठोड, कोष्याध्यक्ष कुलदिप चव्हाण, व्यापारी दळ अध्यक्ष उल्हास पवार, चेतन चव्हाण, गोपाल राठोड यांनी निवेदनात म्हटलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे